https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: आदिवासी दफनभूमी / स्मशानभूमी चोरीला गेली भाग 6.......

रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी / स्मशानभूमी चोरीला गेली भाग 6.......

🙏नमस्कार मित्रांनो काल दिनांक 23/9/2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी चोरीला गेले भाग पाच बघितला आज दिनांक 24/9/2023 रोजी आदिवासी दफन  भूमी चोरीला गेली भाग 6....बघणार आहोत कालच्या भागात आपण बघितले की कशा 🖊🖋🙏पद्धतीने आपण यांना नोटीस काढल्या त्यापूर्वी सांगू इच्छितो की दिनांक 6 मार्च 2021 रोजी मी आणि माझे चुलत बंधू भाऊसाहेब बर्डे पैठण येथे एडवोकेट संदीप शेषराव शिंदे साहेबांना भेटण्यासाठी गेलो आणि त्यांना दफण भूमी संदर्भात पूर्ण कागदपत्रे सुपूर्त केली त्यानंतर त्यांनी 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये अतिक्रमण धारक साहेबराव यादव प्रधान यांना व त्यांच्या कुटुंबातील पत्नी व मुलाला आणि साहेबराव प्रधान यांनी ज्यांना विहिरीसाठी जागा रजिस्ट्री करून दिली होती या सर्वांना नोटीस काढले यांच्या हातात नोटीस पडल्यानंतर या लोकांच्या बुडाखाली सुतळी बॉम्ब लावल्यासारखा भास यांना होऊ लागला मग काय न्यायालयाची कार्यप्रणाली सुरू झाली नोटीस पोहोच करणे पुढील तारीख येणे त्यामध्ये काहींना नोटीस हातात पडल्यानंतर पुढच्या हेरिंगला ते हजर व्हायचे व त्यांचा लेखी स्वरूपाचा जबाब मांडायचे तसेच रजिस्ट्रीमध्ये काहींचे आडनाव चुकीचे केलेले होते त्यामुळे काहींनी नोटीस स्वीकारल्या नाहीत परंतु त्यांचे आडनाव चुकले होते ते करेक्शन करण्यासाठी एक दीड महिना कालावधी गेला असं करत करत स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप न्यायालयाची कार्यप्रणाली चालू आहे यामध्ये काही राजकारणी स्वतःच्या राजकारणाचा पावर दाखवण्यासाठी देखील मैदानात उतरलेले होते मग मला मानसिक तणावात देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला परंतु शेवटी न्याय तो न्यायचा असतो सत्यमेव जयते कारण न्यायालयाच्या पायरीवर गेल्यानंतर भले  उशीर होऊ शकतो उशिरा न्याय मिळू शकतो पण न्याय हा तुम्हाला निश्चितच मिळणार फक्त विश्वास ठेवा तसेच आपल्या आणि वकिलांचे नाते हे पारदर्शक स्वरूपाचे असले पाहिजे हे देखील खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी आपण कुठल्याही चुका करता कामा नये मग काय काहीजण हजर झाले तारखेत पण मित्रांनो तारखेला हजर झाल्यानंतरही यांची दूषित मानसिकता दिसून येण्यास तयार झाली कारण खुद माझा माझ्या  डोळ्यावरती विश्वास बसत नव्हता की देवाच्या नावानं रात्रंदिवस भजणारी हे लोक इतकं खोटं कसं बोलू शकतात कसं शक्य आहे एवढं आणि कसं जमतंय या लोकांना मी त्यांच्या जबाबाची  छायांकित प्रत न्यायालयातून काढली त्यावेळेस डोकं अक्षरशा चक्रावून गेल्यासारखे विषय निदर्शनास आले कारण यांनी तर मला पक्क रेती माफियाच बनवलं त्यांचं म्हणणं असं आहे की मी सदरील जागेवरती दावा यासाठी टाकला की मी खूप मोठा रेती माफीया  आहे परंतु तुम्हाला सांगू इच्छितो रेती माफीया याचा आणि माझा कसलाही एक संबंध नाही कारण ते माझं क्षेत्र नाही आणि हो मी जर रे ती माफीया असतो तर माझ्या नावावर खूप मोठ मोठ्या गाड्या असतात या विषयावरूनच लक्षात यायला पाहिजे होते यांच्या कारण मी इमामपूर वाडी गावापासून वाकी साधारणता एक किलोमीटर अंतरापर्यंत माझं घर आहे तिथून कालपर्यंत जी लोक आदिवासी भिल समाजाचा व्यक्ती मयत झाल्यावर अंत्यविधी करण्यासाठी आमच्या पूर्वी पार दफन भूमीमध्ये उभा राहत होते आज तेच म्हणू लागले की यांची दफन भूमी  ही नाही म्हणून .....वारे दुनिया अजबच प्रसंग आहे ना कारण यावरूनच दिसून येते की हे लोक सत्याचा किती स्वीकार करतात यांच्या ओठात एक आणि पोटात एक आणि नीतिमत्ता मात्र गढूळ पाण्याची जागा विकायचा शॉक तर आहे साहेबराव प्रधान यांना परंतु विहिरी मात्र दफनभुमित . किती मूर्ख पद्धतीचा कारभार आहे हा आपण म्हणतो की ताजमहल आग्र्याला आहे तो वस्तुस्थिती आहे तिथेच परंतु इथे परिस्थिती अशी झाली की प्लॉट घ्यायचा औरंगाबादला आणि घर मात्र बांधायचं पैठणला यांना तर  पुरस्कार द्यायला हवा वर तोंड करून पुन्हा माझ्यावर आरोप करू लागले सांगायचे तात्पर्य एवढेच की न्यायालयापर्यंत गेल्यानंतर या लोकांची वस्तुस्थिती आणि विचारधारा माझ्या लक्षात येऊ लागले आणि कालपर्यंत त्यांच्यापैकीच एक दोघेजण जे तलाठी मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांना सांगत होती की नाही आदिवासी दफनभूमीवर अतिक्रमण साहेबराव प्रधान यांनी केलेला आहे ज्यावेळेस त्यांचे देखील नाव रजिस्ट्रीमध्ये आले त्यामुळे त्यांच्यावर देखील खटला हा भरावा लागला आज ते देखील न्यायालयासमोर म्हणू लागले की यांची दफन भूमी इकडे नाहीये म्हणून प्रश्न कीती सरळ आहे ना हा कारण सरळ सोपा विषय होता पंचकमिटीने ज्यावेळेस असं ठरवले होते की निम्म्यानिमी फी भरून मोजणी करायची मग या भाऊंना भीती कसली वाटत होती मोजणी करायला का माघार घेतली पुन्हा न्यायालयापर्यंत आले नोटीस पाठवल्यानंतर नोटीस पाठवली हजर झाले त्यानंतर साहेबराव प्रधान यांचा दुःखत निधन झाले  कारण ते बिमार होते परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो कारण त्यांनी आल्या जीवनात खूप काही पुण्याचे काम केले चला तर मित्रांनो यानंतर उर्वरित पुढील भाग 7 हा आपण उद्या बघू यात धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम.       जास्तीत जास्त शेअर करा भावांनो 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...