https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: आदिवासी समाजाने स्वतःच्या रक्ताने माननीय सुप्रीम कोर्ट जज भूषण गवई साहेबांना लिहले पत्र👉

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

आदिवासी समाजाने स्वतःच्या रक्ताने माननीय सुप्रीम कोर्ट जज भूषण गवई साहेबांना लिहले पत्र👉


नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन

✒️(समाज प्रतिनिधी :अनिल पवार)
धाराशिव, २३ सप्टेंबर २०२५ : नवरात्राच्या शुभ मुहूर्तात साड्यांच्या रंगांची चर्चा जोरदार सुरू असताना, महाराष्ट्रातील वंचित आदिवासी पारधी बांधवांनी मात्र स्वतःच्या रक्ताच्या रंगाने न्यायाची मागणी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील गायरान जमिनीच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या या पारधी बांधवांनी स्वतःच्या हाताने रक्ताने लिहिलेले पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पाठवले आहे. वर्षानुवर्षे गायरान जमिनींवर राहणाऱ्या या आदिवासी कुटुंबांना नावावर नसल्याने घर बांधता येत नसल्याची व्यथा त्यात मांडली आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व पारधी समाजातील कार्यकर्ते बजरंग ताठे करत आहेत. ते म्हणाले, "आमचे जगणे पणाला लागले आहे. गायरान जमिनींवर आम्ही दशकानुदशके वावरत आहोत, पण त्या आमच्या नावावर होतं नाहीत. जिथे राहतो तिथेही मालकी हक्क नसल्याने साधे घर बांधता येत नाही. नवरात्राच्या या पावित्र्य काळात आम्ही स्वतःच्या रक्ताने हे पत्र लिहून सरन्यायाधीशांकडे न्यायाची याचना करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की, सर्वोच्च न्यायालय वंचितांच्या प्रश्नांना न्याय देईल."

धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी पारधी बांधवांचे हे आंदोलन गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. गायरान जमिनींच्या नियमांमुळे आदिवासी समाजाला मिळणाऱ्या हक्कांवर बंधने येत असल्याचा आरोप करत ते न्यायालयीन मार्ग अवलंबत आहेत. बजरंग ताठे यांच्या नेतृत्वाखालील या संघर्षात सुमारे ५०० हून अधिक कुटुंबे सहभागी झाली आहेत. ते म्हणाले, "हे पत्र आमच्या रक्ताने लिहिलेले आहे, कारण आमची व्यथा तेवढ्याच रंगाची आहे. आम्ही फक्त हक्क मागत आहोत, जे घटनेने आम्हाला मिळणारे आहेत."

या घटनेने सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि आदिवासी समाजात कुतूहल निर्माण झाले आहे. अनेक संघटना या आंदोलनाला पाठिंबा देत असून, सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद येईल, अशी अपेक्षा आहे. नवरात्राच्या नऊ रंगांप्रमाणे या संघर्षाला न्यायाच्या रंगाने रंगवले जावे, अशी प्रार्थना पारधी बांधव करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...