https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: आदिवासी दफनभूमी/स्मशानभूमी चोरीला गेली भाग 5.....

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी/स्मशानभूमी चोरीला गेली भाग 5.....

नमस्कार मित्रांनो काल दिनांक 22 /9/2023 रोजी आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग चार बघितला होता आज दिनांक 23/9/2023 रोजी भाग पाच बघणार आहोत भाग चार मध्ये झालेला पंचनामा पंचकमिटीने काढलेला तोडगा त्या संदर्भात ठरलेले नियोजन त्यामध्ये कशा पद्धतीने पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीची निर्मिती प्रतिवादी आणि वादी दोन्ही समूहाने भरायचे हे ठरले होते त्यानंतर आम्ही पंधरा दिवसाची वाट बघितल्यानंतर ग्रामपंचायतला5/3/2020 तारखेला लेखी स्वरूपाचे पत्र देण्यात आले की आम्ही की आम्ही पंधरा दिवसांनी भूमी अभिलेख कार्यालय पैठण येथे निम्मी मोजणी फी भरण्यास तयार आहे तुम्ही साहेबराव प्रधान यांना लेखी स्वरूपाचे पत्र काढावे तसेच ग्रामपंचायत ने आम्ही दिलेले पत्र बाहेर नोटीस बोर्ड लावले देखील आणि साहेबराव प्रधान यांना वारंवार सूचित करून देखील सांगण्यात आले की तुम्ही तुमच्या वाट्याची मोजणी फी भरण्यास तयार राहा आदिवासी भील समाज त्यांच्या वाटेची फी भरणार असून तुम्ही पंधरा दिवसांनी मोजणी फी भरायची आहे मग यानंतर पुढे काय झालं ती म्हण आहे ना बाप दाखव तर श्राद्ध कर साहेबराव प्रधान पंचनामा करतानी भले मोठमोठे हाकून मोकळे झाले मी पंचनामेस तयार आहे मी मोजणी भरण्यास तयार आहे मी मोजणी करण्यास तयार आहे नंतर भाऊंची बत्ती गुल झाली उत्तर ग्रामपंचायतला देऊ लागले म्हणून लागले की माझी जमीन नाहीये माझा तिथं काही एक संबंध नाही मग ताबा करण्यासाठी कसला संबंध आला मग अतिक्रमण करण्यासाठी यांना कोणी नारळ दिले का ते दफन भूमीत  निघू लागलेले पीक पाणी या पैशाच्या धुंदी त त्यांना त्या दफन भूमीच अतिक्रमण सोडू वाटत नव्हतं मंग झालं तसंच भाऊ पळकुट्यावानी पळू लागले मोजणी फी भरण्याचे नावाने त्यांच्या अंगाला काटे येऊ लागले बिचारी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक साहेब त्यांना वारंवार सूचित करू लागले सांगू लागले ग्रामसेवकांना म्हणायला लागले की मला घेणेदेणे नाही त्यांना सांगा की तुम्हीच मोजणी करा आता प्रश्न असा उभा राहिला की आमची दफनभूमीचीभिल् समाजाची आहे ती आहे एक गाळपेरा त्याला गट नंबर नाही आणि गट नंबर 44 मध्ये साहेबराव यादव प्रधान यांची जमीन होती 39 गुंठे त्यापैकी त्यांनी विहिरी वाल्यांना विकलेली आहे सात गुंठे त्यांनी रजिस्ट्री केली त्यांच्या 39 गुंठे मधून आणि विहिरी मात्र खांद कामं आदिवासी समाजाच्या  दफन भूमीमध्ये नंतर त्यांना भीती वाटू लागली मोजणी जर आपण केली तर आपलं पितळ उघड पडेल म्हणून त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता कीआदिवासी दफन भूमीचा मुद्दा इतका कोणीतरी तापवेल पंधरा दिवसांनी वारंवार त्यांना सांगण्यात आलं एक महिना झाला दोन महिने झाले वारंवार सूचित करण्यात आले तरी देखील भाऊंच्या डोक्यात कुठल्याही प्रकारचा प्रकाश पडत नव्हता मग झालं काय ज्या ज्या लोकांना त्यांनी विहिरीसाठी रजिस्ट्री करून दिली होती जागा त्यांच्या त्यांच्या तापवा तापीचा वातावरण तयार झालं मी वैयक्तिक स्वरूपात पैठण भूमी अभिलेख कार्यालयाला जाऊन पूर्ण संदर्भ अधिकाऱ्यांना सांगून त्या संदर्भात मोजणीचा अर्ज देखील भरला परंतु मोजणीचा नियम असा आहे की एक तर मालकच त्या जमिनीची मोजणी करू शकतो आणि गट नंबर 44 मधला आपला कुठल्याही एक इंचभर जागा देखील नको आपल्याला हवाय फक्त आपला गाळपेरा दफनभूमी शेवटी ग्रामसेवक देखील थकून गेले त्या बाबाच्या मागे पळून पळून त्यांना सूचित करू करू मग मी पुन्हा तहसीलदार साहेब यांना जाऊन भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं सविस्तर असा असा विषय झालेला आहे म्हणून मग यावरती पर्याय देखील काय काढणार आता बऱ्याचशा लोकांना वाटत असेल की यांनी कलेक्टरपर्यंत जायला पाहिजे होतं आयुक्तांपर्यंत जायला पाहिजे होतं मित्रांनो सांगायचं एवढं की मी सर्वांपर्यंत पळालो पण कसं असतं ना अशा दूषित विचार वृत्तीचे लोक एखाद्या मंत्र्याच्या संत्र्याच्या बगलात उभा राहिले की जणू त्यांना असं वाटू लागतं की मंत्र्यांनी आपल्याला दत्तकच घेतलेले आहे मग काय वरच्या लेव्हलचे अधिकाऱ्यांवरती प्रेशर येऊ लागला त्यांना सांगण्यात आलं की त्या प्रकरणापासून दूर राहा मी आणि माझे सहकारी मित्र वारंवार चक्रा मारून परेशान झालो मग शेवटी मात्र पर्याय एकच उरला तो म्हणजे न्यायालय न्यायालयात जाण्यापूर्वी भाऊ मोजणीसाठी तयार नव्हते आता इथून पुढची जी गोष्ट घडली ती खूपच मनोरंजक आणि हास्यास्पद आहे विशेष म्हणजे रात्रंदिवस देवाला भज णारी ही लोक रात्रंदिवस टाळ पखात कीर्तन अभंग गाणारे लोक यात दफन भूमी प्रकरणांमध्ये रजिस्ट्रीत त्यांचे नाव येऊ लागले मंग काय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी परिस्थिती तयार झाली मग न्यायालयात जाण्यासाठी एक वकील  आवश्यक आहे त्यासाठी आर्थिक बाजू मजबूत असणे गरजेचे आहे त्यातच आदिवासी भील समाज दिन दुबळा यावर कसा पर्याय शोधेल परंतु मित्रांनो इथपर्यंत थांबायचं नाही अस आम्ही ठरवलं होतं खूप जीवाची काटकसर करून पळ पळ करून खवदाव करून शेवटी हे प्रकरण पैठण माननीय न्यायालय यांच्या दालनात नेण्यात आलं मग काय चक्रीवादळ फिरल्यासारखी गंमत झाली विहिरी वाले त्यामध्ये आले दहा अकरा जण आणि स्वतः प्रतिवादी मध्ये साहेबराव प्रधान त्यांचा मुलगा त्यांची पत्नी कारण साहेबराव प्रधान यांची जमीन त्यांच्या पत्नीच्या नावावर होती आता प्रत्येक गावामध्ये झाकाडाला करणारे डोमकावळे बऱ्याच पद्धतीने असतात त्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करू लागला आम्ही ठरवलं असं की आम्ही काही प्रकरणांमध्ये माघार घेणार नाही समाजासाठी जीव गेला तर चालेल परंतु अशा परिस्थितीत माघार घेणे योग्य नाही मग आम्ही एक वकील लावला आणि यांचे तीन-तीन वकील मी ज्यावेळेस न्यायालयात प्रकरण दाखल केले त्यावेळेस प्रत्येकाला नोटीस इशू झाल्या नोटीस निघाल्यानंतर यांची गंमत अशी झाली की जणू काही यांच्या बुडाखाली कोणीतरी सुतळी बॉम्ब ठेवला की काय चला तर मित्रांनो या पुढील सविस्तर गम्मत आपण आदिवासी द फन भूमी भाग सहा मध्ये बघूया..... जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...