https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: आदिवासी दफनभूमी// स्मशानभूमी चोरला गेली भाग 7.......

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी// स्मशानभूमी चोरला गेली भाग 7.......

🙏नमस्कार मित्रांनो काल दिनांक 24/ 9 /2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग सहा बघितला होता आज दिनांक 25 /9/ 2023 रोजी आदिवासी दफन भुमी चोरीला गेली भाग 7 बघणार आहोत भाग सहा मध्ये आपण बघितले होते की साहेबराव प्रधान यांचे कशा पद्धतीने दुखद निधन झाले होते कोर्टात हजर झाल्याच्या नंतर आता डोक्यात असा प्रश्न पडला की जो प्रतिवादी होता की तोच एक्सपायर झाल्यानंतर हा खटला चालवायचा कसा परंतु यामध्ये देखील कायदेशीर पद्धती आहेत प्रतिवादी जर मयत झाले तर प्रतिवादींची पत्नी आणि त्यांचे वारस यांना देखील कायद्याच्या चौकटीत उभा करता येऊ शकते आणि आपण देखील तेच केले मी ज्यावेळेस आदिवासी दफन भूमीच्या संदर्भात खटला न्यायालयात दाखल केला होता त्याच वेळेस साहेबराव यादव प्रधान यांची पत्नी द्रोपदाबाई साहेबराव प्रधान व मुलगा राजू  साहेबराव प्रधान यांचे  आधीच नाव टाकले होते त्यामुळे यांना देखील साहेबराव प्रधान यांना ज्यावेळेस न्यायालयाचे नोटीस गेले त्याच वेळेस यांना देखील नोटीस निघाले होते परंतु मित्रांनो या सर्व प्रकरणांमध्ये अति महत्त्वाची भूमिका बजावलेलं कॅरेक्टर त्यांच्या संदर्भात तुम्हाला थोडेसे दोन शब्द सांगायचं विसरून गेलो  ते म्हणजे माझे आदरणीय पुज्य आणि गुरू मानलेले शिवानंद टाकसाळे साहेब साहेबांनी मला वारंवार कशा पद्धतीने कार्यप्रणाली करायची व कशा पद्धतीने पाठपुरावा करायचा आहे वारंवार साहेबांनी मला सांगितले व सुचवले या प्रकरणांमध्ये जर गरिबांचे कैवारी म्हणून माझ्या सोबत अडचणीत उभा राहिले ते म्हणजे आपले माननीय शिवानंद टाकसाळ साहेब त्यावेळेस ते औरंगाबादला विभागीय आयुक्त या पदावर होते आणि त्यांचं काम देखील खूप स्टेट फॉरवर्ड असायचं त्यांच्याकडे जर गरिबांच्या संदर्भात कुठले प्रकरण जर गेले कधी तरी तात्काळ त्यावर ॲक्शन घेत असत साहेबांची ओळखच त्यांच्या कामामुळे ते अतिशय प्रेमळ स्वभाव तसेच कायद्याच्या दृष्टिकोनातून खूप चतुर आणि हुशार देखील परंतु दुर्दैव असं झालं की साहेबांनी या प्रकरणांमध्ये स्टेट फॉरवर्ड ॲक्शन घेते वेळेसच साहेबांची बदली दुसऱ्या स्टेट ला बदली झाली नाही तर आपल्याला न्यायालयात देखील येण्याची गरज पडली नसते असो ते आपलंच दुर्दैव समजावे लागेल साहेबराव प्रधान आणि त्यांच्या वारसांना नोटीस निघाल्यानंतर ते हजर झाले त्यांचे लेखी स्वरूपाचे जबाब देखील न्यायालयात नोंदवले गेले मी त्यांच्या छायांकित प्रती काढून त्यांच्या जबाब मधे त्यांनी मला कशा पद्धतीने रेती माफियामध्ये उल्लेख केला होता आणि कशा पद्धतीने माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व कशा पद्धतीने मला मानसिक तणावातून जावं लागलं अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्यासोबत घडल्या मित्रांनो तरी देखील आपण माघार घ्यायची नाही प्रयत्न आपल्या सतत चालू असणार कारण आपली दफनभूमी हक्काची नाही कुणाच्या बापाची 1968 पासून जातीवाचक इमांपूर गावात पद्धतीचा स्वभाव दिसून येत आहे कारण त्यावेळेस आदिवासी भील समाजाला शिक्षण नव्हतं आणि शिक्षण नसल्याकारणाने आपला समाज भित्र्या स्वरूपाची वागणूक होती परंतु आता सध्याच्या काळामध्ये खूप काही मुलं शिकलेले आहेत आणि घेका .दे .करणाऱ्या स्वभावाचे आहेत त्यामुळे बऱ्यापैकी फरक या दूषित विचारसरणीच्या लोकांना पडलेला आहे आणि यांना चोप देखील बस लेला आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यानंतर जे उर्वरित मंडळी होती विहिरींची रजिस्ट्री करून घेणारे विहिरीसाठी जागा विकत घेणारे हे देखील हळूहळू न्यायालयात हजर होऊ लागले व त्यांचे लेखी स्वरूपाचे स्टेटमेंट देऊ लागले त्यांच्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी विशेष असं काही दिलं नव्हतं त्यांचं म्हणणं फक्त एकच पडलं की आम्हाला माहीत नव्हतं की सदरील गटामध्ये आदिवासी समाजाची दफनभूमी आहे म्हणून आम्ही फक्त विहिरीसाठी जागा घेतलेली आहे आणि ती जागा आम्ही साहेबराव यादव प्रधान यांच्याकडून घेतलेली आहे तसेच त्यांनी रजिस्ट्रेशन नकला देखील न्यायालयाकडे सादर केल्या आता आपल्यापुढे फक्त प्रश्न एकच आहे मित्रांनो की आपण एवढी सगळी खटाटोप करून न्यायालय पर्यंत धाव घेतली तर आपलं फक्त म्हणणं एवढंच आहे की गट नंबर 44 च्या लगत असलेले आपली आदिवासी समाजाची दफन भूमी तिचे अतिक्रमण हटवण्यात यावे न्यायालयाने साहेबराव यादव प्रधान यांच्या मालकीची असलेली जमीन 39 गुंठे याची तात्काळ मोजण्याचे आदेश व्हावे यासाठी आपण वारंवार प्रयत्न करत आहोत अशा बऱ्याचश्या मोठमोठाल्या प्रसंगातून अजून आपल्याला निघायचं आहे माझ्या गावापासून पैठण सुमारे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे दर महिन्याला तारीख येणार हेरिंगला हजर होणे कारण आपला संघर्ष तर चालूच राहणार आणि आपण दफनभूमीसाठी खूप तर प्रयत्न करतच आहोत अजूनही देखील प्रयत्न करणार आहोत न्यायालयामध्ये आल्यानंतर समोरील प्रतिवादी व्यक्ती हजर झाल्याच्या नंतर खुन्नस देणे खुन्नस देऊन बघणे दबावात घेणे मानसिकता तणावात घेणे राजकारणी लोकांच्या माध्यमातून माझ्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करणे असे बरेच प्रकार त्यांनी चालू केले परंतु आपण माघार घेतली नाही आपले प्रयत्न आपण सदैव तत्पर पद्धतीने चालू ठेवले बाकी जो काही निर्णय देन तो न्यायालयाचे कामं आहेत आपण आपले प्रयत्न वारंवार चालू ठेवणार त्यानंतर उर्वरित लोकांच्या स्टेटमेंट मध्ये कशा पद्धतीने यांच्या यांच्या स्टेटमेंट खालीवर झाले आणि यांच्या यांच्यात गोंधळ निर्माण झाला यावर देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कारण विहिरीसाठी रजिस्ट्रीला जागा विकत घेणारी लोक जी होती ती ईतर गावातली होती आता यांच्यात गोंधळ असा झाला की दुसऱ्या गावातील व्यक्तींचे म्हणणे पडले व तुम्ही प्रॉपर गावातील माणसं असून तुम्हाला माहीत नव्हतं का की ती आदिवासी समाजाची दफन भूमी आहे म्हणून मग तुम्ही कसं काय त्यांच्या दफन भूमीमध्ये विहिरी खोदल्या आणि आम्हाला  देखील जागा घ्यायला लावली आणि विहिरी खांदायला लावल्या असे बरेचसे प्रसंग तिथे घडू लागले कारण इमामपूर मधील दूषित विचारांच्या लोकांना कळू लागलं की आता आपलं इथं पितळ उघड पडत चाललेलं आहे म्हणून वाट फक्त आपण एकच बघायची ज्यावेळेस न्यायालयाच्या निदर्शनास ही गोष्ट येईल त्यावेळेस या लोकांवर सरळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 च्या कायद्यानुसार आपण यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करणार यांना देखील कळायला पाहिजे की आदिवासी समाजाला त्रास दिल्यानंतर कायघडतं म्हणून त्यासाठी मी माझे जे काही प्रयत्न असेल माझ्या सहकारांची जी काही मदत लागेल ती घेईलच आणि प्रयत्न देखील चालू ठेवू वेळ पडली सेवा विधी प्राधिकरणामध्ये देखील हे प्रकरण दाखल करू पण त्यामध्ये स्टेप आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे  आणि  आपण सत्र न्यायालयात देखील जाऊ चला तर मित्रांनो तुमचे वारंवार असेच या लेखाच्या माध्यमातून मिळत असलेले प्रेम भावना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत असेच आपले प्रेम सदैव माझ्यावर राहू द्या अशी मी प्रत्येकाकडून अपेक्षा करतो जय आदिवासी जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद भेटूया नंतर पुढील भाग 8. मध्ये लवकरच.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 कायद्यापुढे सगळे समान अखेर पीडित कुटुंबाला पंधरा वर्षांनी वासीम सत्र न्यायालयाने दिला न्याय

👉 वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने २ जुलै २०२६ रोजी एका ऐतिहासिक निकालात पोलीस कोठडीतील मृत्यू (Custodial Death) प्रकरणी तत्कालीन ठाणेदारासह ...