https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update

रविवार, २८ जुलै, २०२४

शबरी घरकुल योजनेची सविस्तर माहिती व लागणारे कागदपत्र.

 

  • शबरी घरकुल मंजूर कसे करावे ? याची सविस्तर माहिती.                     नमस्कार मी आदिवासी जमात विकास परिषदेचा संस्थापक अध्यक्ष किरण सखाराम बर्डे आज आपण बघणार आहोत की शबरी घरकुल कशा पद्धतीने मंजूर करता येते यावर सविस्तर माहिती आपण बघणार आहोत बऱ्याच नागरिकांना शबरी घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यावा ते कसे मंजूर होईल त्यासाठी कागदपत्र काय लागतील असे बरेचसे प्रश्न निर्माण होतात परंतु या सर्व  पद्धतीचा पाठपुरावा करता करता काही लाभार्थ्यांचे घरकुल रद्द होतात.  चला तर मग यासाठी लागणारे कागदपत्राची माहिती बघू 1). आधार कार्ड झेरॉक्स  2). बँक पासबुक झेरॉक्स 3) जात प्रमाणपत्र झेरॉक्स  4). उत्पन्न प्रमाणपत्र झेरॉक्स .5) विहित नमुन्यातील अर्ज. 6) पासपोर्ट साईज फोटो .7) ग्रामपंचायत ठराव असे वरीलपैकी सर्व कागदपत्र तयार करून विहित नमुन्यातील अर्ज भरून ग्रामपंचायत ठराव मध्ये नाव घेऊन आपल्या ग्रामपंचायत मधील संबंधित ग्रामसेवकांकडे आपण ते जमा करायचे आहे कागदपत्र व अर्ज जमा केल्याच्या नंतर संबंधित ग्रामसेवक यांची नैतिक जबाबदारी असते की त्यांनी संबंधित पंचायत समिती येथे पूर्ण शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रस्ताव दाखल करायचा असतो पंचायत समिती येथे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पंचायत समिती येथे आपण दिलेल्या कागदपत्राची प्रस्तावाची पडताळणी होत असते म्हणजेच छाननी प्रक्रिया सुरू होत असते पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या विहित नमुन्यातील अर्ज म्हणजे पाहिली पुढील वरिष्ठ स्तरावरती पाठवण्यात येतात अशा पद्धतीने आपण शबरी घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि त्यासाठी कोणती पद्धत अवलंबायची आहे त्यानुसार याची सविस्तर माहिती बघितलेली आहे माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा…जय हिंद जय आदिवासी जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम……

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेले भाग-12..


 नमस्कार मित्रांनो दिनांक 29/ 9 /2023 रोजी आपण दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 11 बघितला होता त्यानंतर आज दिनांक 4/ 10 /2023 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग बारा बघणार आहोत त्यापूर्वी तुमची सर्वांची क्षमा मागतो मित्रांनो की 29 ते चार तारखेपर्यंत खूप काही कामत व्यस्त असल्यामुळे मी भाग 12 तयार करू शकलो नाही  या चार दिवसाच्या दरम्यान मला थोडा उशीर झाला त्यामध्येच आपले माझ्यावरती असलेले आशीर्वाद व प्रेम दिसून आले कारण मला खूप जणांनी पर्सनली माझ्या फोन नंबर वर फोन करून विचारपूस झाली सदर पुढचा भाग तुम्ही केव्हा तयार करणार आहोत आणि मी यासाठी केलेला संघर्ष व समाजासाठी दिलेला वेळ याचं देखील बऱ्यापैकी कौतुक करण्यात आलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनापासून ऋणी आहे आपले सदैव असेच प्रेम माझ्यावरती राहू द्या यापेक्षा करतो 🙏चला तर मित्रांनो आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग १२ सुरू करूयात आज दिनांक 4/ 10 /2023 रोजी भाग 11 मध्ये आपण बघितले होते की प्रतिवादी साहेबराव प्रधान यांनी स्वतः 2011 मध्ये वादी बनवून स्वतः न्यायालयात खटला दाखल केला होता दीड ते दोन वर्षे तो खटला न्यायालयामध्ये चालू होता परंतु न्यायालयात सबळ पुरावे सादर न झाल्यामुळे न्यायालयाने तो खटला खरीज केला होता म्हणजे अक्षरशः डोके चक्रावून टाकणारा प्रसंग आणि घटना दैनंदिन जीवनामध्ये घडत आहेत परंतु सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन कामातून व कुटुंबातील जबाबदारीतून व कर्तव्यातून वेळ मिळत नाही म्हणून समाजात याचे बांडगुळे तयार होतात आणि गरीब लोकांना फसवण्याचे काम करतात कारण या प्रसंगावरून एक लक्षात येते की आपण जर शिकलं नाही तर आपण अधोगती कडे नक्की जाणार आणि याच लाजिरवाणी आणि दुबळ्या पानांचा फायदा हे लोक घेत असतात कारण यामध्ये बऱ्यापैकी लोक आदिवासी भील समाजाला सहकार्य सपोर्ट आणि मदत देखील करतात परंतु आमच्या इमामपूर गावामध्ये असे बोटावर मोजणे इतके महान व्यक्तिमत्व आहे किती त्यांचा संसार ग्रामपंचायत च्या जीवावर चालवण्यासाठी पंचायत मध्ये आणि इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात परंतु मित्रांनो एक विषय लक्षात येत  नाही की माणसाचे विचार एवढे कसे गडूळ असू शकतात माणसाची बुद्धी एवढी कशी शेण खाल्ल्या सारखी चालू शकते असो तो दुसरा प्रसंग आ हे तो मी सविस्तर चर्चा करणार आहे. आता मूळ मुद्याला येतो  आता पराग्राफ नंबर 7... हे की दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास प्रतिवादीचा असाच हरकत अडथळा चालू राहिल्यास दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी उपभोगासारख्या मौल्यवान हक्कावर गदा येईल व त्यापासून वादी वंचित होईल परिणामी वादीचे अपरिमित असे नुकसान होईल ज्याची भरपाई प्रतीवादी करु शकणार नाही अशा परिस्थितीत दावा मिळकतीवरील वादीच्या कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळा होईल तसेच दावा मिळकतीमध्ये स्मशानभूमी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य प्रतिवादीने करू नये असा वादीला प्रतिवादी विरुद्ध निरंतरचा मनाई हुकूम मिळणे न्याय व जरुरीचे आहे पॅरेग्राफ क्रमांक आठ हे की वादीचा दावा निरंतर मनाई हुकुम मिळणेबाबतचा असल्यामुळे वादीने त्यासाठी ठराविक कोर्ट फीज रुपये 200 दिले आहे जी योग्य व पुरेशी आहे मेहरबान कोर्टाच्या आर्थिक मर्यादेसाठी प्रोसेस व इत्यादीसाठी वादीने दाव्याची किंमत रुपये एक हजार रुपये केली आहे मेहरबान कोर्टात सदरचा दावा चालविण्याचा अधिकार आहे वादीचा दावा प्रतिवादी विरुद्ध खालील प्रमाणे खर्चासह डिग्री करण्यात यावा दाव्याचे कलम नंबर एक मध्ये वर्णन केलेल्या दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळा होईल तसेच दावा मिळकतीमध्ये स्मशानभूमी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य प्रतिवादीने स्वतः अथवा त्यांचे हस्तक किंवा अन्य कोणाही मार्फत करू नये असा वादीला प्रतिवादीन विरुद्ध निरंतर चा मनाई हुकूम मिळावा ब... वादीला प्रतिवादीकडून या दाव्याचा खर्च व अन्य अनुषंगिक योग्य ती दात मिळण्याचा हुकूम व्हावा.... मित्रांनो हे होते साहेबराव प्रधान यांनी 2011 मध्ये वादी बनवून आदिवासी भिल समाजातील चार व्यक्तींवर खटला दाखल केला होता त्या दाव्याच्या संदर्भातले टोटल विवरण मी तुमच्यासमोर सादर केलेले आहे तसेच आता प्रश्न डोक्यात असा आला की यांना जर यांना जर खर्चासकट नुकसान भरपाई की दावा पाहिजे मग आता 68 च्या पूर्वीपासून आमचा आदिवासी भिल समाज सदरील ठिकाणी अंत्यविधी व दफन विधी करत आलेला आहे आता या दाव्यामध्ये असलेले 2021 च्या दाव्यात असलेले असलेले नमुने यांच्याकडून देखील आपण नुकसान भरपाई की दवा केला पाहिजे तसेच यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा 1889 तसेच सुधारणा आवृत्ती 2014 नुसार अट्रा सिटी चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्या विरोधात मी न्यायालयामध्ये कोर्ट कमिशन देखील मागायची प्रोसेस केली पाहिजे मग या भाऊंना समजेल की कायदा आणि सुव्यवस्था  हे यांना कळेल चला भेटूया पुढच्या भागांमध्ये आदिवासी दफन  भूमी चोरीला गेली भाग 13 मध्ये निश्चितच पुढील विषयावर चर्चा करूयात तोपर्यंत सतर्क रहा सावध रहा तसेच आपले प्रियजनांची काळजी घ्या आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग ....11

नमस्कार मित्रांनो आपण 28/9/2023 रोजी आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 10 बघितलेला आहे आणि आज दिनांक 29 /9/ 2023 रोजी आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 11 बघणार आहोत आज भाग 11 मध्ये आपण नवीन खुलासा करणार आहोत तत्पूर्वी भाग दहा मध्ये आपण बघितले होते की तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचा पंचनामा कशा पद्धतीने झाला होता आणि सातबाराचे अवलोकन करून कशा पद्धतीचे पंचनामाचे स्वरूप तयार झाले होते त्या माध्यमातून एक अति महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडायचं विसरून गेलो दिनांक 7/11/2011 रोजी द्रोपदाबाई साहेबराव प्रधान यांनी पैठण न्यायालय ते दावा दाखल केला होता निरंतर मनाई हुकूमासाठी त्या दाव्याचे स्वरूप आज आपण भाग 11 मध्ये बघणार आहोत प्रतिवादी त्यांनी किती जणांना केले आहे हे देखील सविस्तर बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आता यामध्ये वादी म्हणजे दावा दाखल करणारे द्रोपदाबाई साहेबराव प्रधान हे आहेत आणि यांनी चार जणांविरुद्ध खटला दाखल केला होता चला तर मग त्याचे अर्ज जणांचा सविस्तर माहिती बघुयात प्रतिवादी क्रमांक एक लक्ष्मण पिता चंद्रभान मोरे वय 70 वर्ष धंदा मजुरी राहणार इमामपूर वाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद प्रतिवादी क्रमांक दोन हरिश्चंद्र पिता शंकर दळवी वय 45 वर्ष धंदा व राहणार सदर प्रतिवादी क्रमांक तीन बबन पिता गोविंद मोरे वय ४५ वर्ष धंदा व राहणार सदर प्रतिवादी क्रमांक चार सखाराम पिता बंडू बर्डे वय 36 वर्ष धंदा मजुरी राहणार वाकी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद आता इथे प्रतिवादी क्रमांक चार म्हणजे माझ्या वडिलांच्या पत्त्यामध्ये वाकी टाकण्यात आलेल्या आणि त्यांचा मुळात जन्मच इमामपूर या ठिकाणी झाला आहे चला तर मग वादीच्या दाव्याचे स्वरूप बघूया एक अति महत्त्वाचे मित्रांनो आज मी जो फोटो अपलोड केला आहे तुझा पण भूमीत काढलेला फोटो आहे पॅरेग्राफ क्रमांक दोन हे के दावा जमीन गट नंबर 44 पैकी 39 आर क्षेत्र वादीने जमिनीचे पूर्वीचे मालक बबन धनाजी कोकाटे राहणार पैठण खेडा तालुका पैठण यांच्याकडून कायम रजिस्टर खरेदीखत दिनांक 16 /8 /1991 रोजी विकत घेतली आहे त्या अन्वये वादी सदर मिळकतीची कायदेशीर मालक व कर्जदार झाली असून मिळकतीचा मालकी कब्जे हक्काने उपभोग घेत आली आहे त्यासंबंधीचा वादीच्या नावे सातबारा रेवेन्यू रेकॉर्डला फेर क्रमांक 114 मंजूर आहे तसेच गट नंबर 44 पैकी साहेबराव प्रधान यांच्या मालकी हक्कातील 39 आर पैकी दोन गुंठे क्षेत्रवादीने नंदकिशोर सिताराम लोखंडे ,शंकर दत्तात्रय आमले ,देवराव अंबादास गायकवाड, यांना खरेदी खतानुसार विहिरीसाठी विक्री केली त्यामुळे उर्वरित क्षेत्र 37 आर ही दावा मिळकत आहे सदर दावा मिळकतीची कायदेशीर मालक व कब्जेदार वादी आहेत पॅरेग्राफ क्रमांक चार वादी व तिचे कुटुंबीय गरीब असून कायद्याचा मान राखणाऱ्या आहेत त्यांना गावात कोणाची जात नाही उलट प्रतिवादी हे भिल्ल समाजाचे असून आड दांडवृत्तीचे आहेत व त्यांना गावातील लोकांची फुस व साथ आहे दावा मिळकतीशी प्रतिवादी किंवा त्यांच्या समाजाचा काही एक हक्क संबंध नसताना ते गावातील लोकांच्या सांगण्यावरून वरून आदिवासी समाजाची स्मशानभूमी दफनभूमी निर्माण करू पाहत आहेत त्यानुसार प्रतिवादी हे पुढाकार घेऊन दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जे हक्कास व उपभोगास हरकत अडथळ्याचे कृत्य करत आले असून त्यानुसार ते वादीची मिळकत एन के एन प्रकारे हडप करून नुकसान करू पाहत आहेत प्रतिवादीचे सदरची कृत्य अनाधिकृत तसेच बेकायदेशीर स्वरूपाचे आहे पॅरेग्राफ क्रमांक पाच वादी व तिचे कुटुंबीय प्रतिवादी व त्यांच्या समाजातील लोकांना तसेच प्रतिवादींना चि थावनी देणाऱ्या लोकांना दावा मिळकतीशी तुमचा काही एक हक्क संबंध नसल्याचे व दावा मिळकतीमध्ये कोणतीही स्मशानभूमी दफन भूमी नसल्याची बाब समजावून सांगण्यात आले परंतु प्रतिवादी हे वादी व तिच्या कुटुंब यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत आले आहेत प्रतिवादीचे दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळ्याचे कृत्य चालूच आहेत हे होते साहेबराव प्रधान यांचे स्टेटमेंट ज्यावेळेस त्यांनी वादी म्हणून 2011 ला न्यायालयात खटला दाखल केला होता एक विचार मनात येतोय जर एवढं सगळं असताना पंचनामा झाला मोजणीचा मार्ग काढण्यात आला मंग्या बाबांना मोजणीची इतकी का भीती वाटते कारण यांचा आता पितळ उघड व्हायची वेळ आली. चला तर मित्रांनो यानंतर सविस्तर बघुयात आदिवासी द फोन भूमी चोरीला गेली भाग-12 उद्या निश्चितच आपण सुरुवात करणार आहोत कारण प्रतिवादींनी या संदर्भात त्यांचे उत्तर काय सादर केले हे आपल्याला सर्वांना जाणून घ्यायचेच असेल त्यासाठी भेटूया उद्या दिनांक 30 /9 /2023 रोजी जय आदिवासी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम........ धन्यवाद..🙏

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी/स्मशानभूमी चोरीला गेली भाग... 10

नमस्कार मित्रांनो काल दिनांक 27 /9/ 2023 रोजी आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 9.. बघितलेला आहे आणि आज दिनांक 28 9 2023 रोजी आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 10 बघणार आहोत भाग नऊ मध्ये आपण बघितले होते की कशा पद्धतीने तहसीलदार साहेबांचे पत्र निघाले होते तसेच कशा पद्धतीने मोजणीसाठी तयार नसलेल्या साहेबराव प्रधान यांना ग्रामपंचायतीने लेखी व वारंवार तोंडी सूचना दिल्या होत्या तसं पत्र ग्रामपंचायत  आपल्याला दिलं होतं त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आज आपण पंचनामा कशा पद्धतीने झाला व पंचकमिटी मध्ये कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आले आज आपण सविस्तर विवरण बघणार आहोत चला तर मग पुढील लेखकाला सुरुवात करूया पंचनामा दिनांक 4/11/2020 आम्ही खाली सह्या करणार पंच लोक मौजे इमामपूर तालुका पैठण कारणे पंचनामा लिहून देतो की मंडळ अधिकारी विभाग बिडकीन व तलाठी सज्जा मारोळा यांनी बोलविल्यावरून मौजे इमामपूर येथील खाजगी जमीन गट नंबर 44 मध्ये हजर झालो त्यांनी आम्हाला माननीय तहसीलदार पैठण यांचे पत्र जावक क्रमांक 2020 जमाबंदी एक कावी 498 दिनांक 22 सप्टेंबर 2020 हे वाचून दाखवले त्यातील विषय आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफन भूमीवरील अतिक्रमण हटवणे बाबत त्यानुसार प्रत्यक्ष स्थळ पाणी व चौकशी केली व सातबारा अवलोकन केले असता गट नंबर 44 चे एकूण क्षेत्र एक हेक्टर 59 आर असून त्यामध्ये गैर अर्जदार द्रोपदाबाई साहेबराव प्रधान यांचे क्षेत्र छत्तीस आर असल्याचे दिसून येते यापैकी गैर अर्जदाराने दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विहिरीसाठी विकलेले दोन आर क्षेत्र इतर हक्कात नोंद आल्यामुळे मालकी हक्कातून कमी झालेले नाही गैर अर्जदार द्रोपदाबाई साहेबराव प्रधान यांच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रांमध्ये पूर्वी पार वहिवाटीप्रमाणे मौजे इमामपूर येथील भिल्ल आदिवासी समाजाची दफनभूमी स्मशानभूमी असल्याचे उपस्थित पंचांनी सांगितले भिल्ल आदिवासी समाज हे त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे मयत व्यक्तींचे दफन करतात दफन करत असलेल्या जागेवर आज रोजी गैर अर्जदार यांनी उसाची लागवड केलेली आहे त्यामुळे भिल्ल समाजाचे दफन केलेल्या खुणा म्हणजेच त्यांच्या रीतीरीवाजाप्रमाणे दगड तांदळे आज पाहणे केले असता आढळून येत नाही आदिवासी भिल्ल समाज इमामपूर यांचे म्हणणे आहे की सदरील जागा गाळपऱ्याची आहे व त्या लगतचा पूर्व बाजूची शेतकरी द्रोपदाबाई साहेबराव प्रधान यांनी जागा ताब्यात घेऊन उसाची लागवड केली व गैर अर्जदार यांचे पती साहेबराव यादव प्रधान यांचे म्हणणे आहे की सातबारा प्रमाणे माझ्या नावे असलेली जमीन ही माझ्या कब्जात पूर्ण भरत नाही तसेच मी भिल्ल समाजाच्या लोकांना दफनविधी करण्यासाठी अडवणूक अथवा मज्जाव केलेला नाही परंतु गैरअर्जदार हे अंत्यविधी झालेल्या जागेवर दरवर्षी नांगरणी करून पिकाची लागवड करत असतात त्यामुळे या ठिकाणी दफन करण्यास अडचण तयार होते या ठिकाणी सर्व उपस्थित पंच व अर्जदार भिल्ल समाज व गैरअर्जदार यांच्या मतानुसार असे ठरले की अर्जदार व गैर अर्जदार यांनी सामायिक निम्म्या हिस्स्याने मोजणी फी भरून गट नंबर 44 मधील साहेबराव यादव प्रधान यांच्या जमिनीची मोजणी करायचे आणि मोजणी केल्यानंतर गैर अर्जदार यांच्या ताब्यात असलेली भिल्ल समाजाची दफनभूमीची गाळपेरा जमीन शिल्लक ताब्यात भरल्यास ते सौखुशीने ताबा सोडून देतील तोपर्यंत भिल्ल समाजाच्या दफन विधी अडथळा निर्माण करणार नाहीत असे पंचा समक्ष ठरले आहे गट नंबर 44 ची चतुर सीमा पूर्वेस गट नंबर एक खाजगी व पश्चिमेस खाम नदी उत्तरेस गट नंबर 43 मधील नाला याप्रमाणे आहे व भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी गट नंबर 44 च्या पश्चिमेस असलेल्या खाम नदीच्या पूर्व बाजूस पूर्वपार वहिवाट आहे करिता पंचनामा केला आहे मित्रांनो हे होतं आदिवासी दफनभूमीच्या पंचनामाचा स्वरूप पंचनामा झाल्यानंतर पुढे काय घडलं हे बाकी मी तुम्हाला भाग आठ आणि नऊ मध्ये सांगितलं चला तर मग लवकरच घेऊन येतोय आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 11 तोपर्यंत परवानगी असावी जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम........🙏 धन्यवाद 

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग ...9

नमस्कार मित्रांनो काल दिनांक 26/ 9/ 2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग आठ बघितला होता आणि आज दिनांक 27 /9/ 2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी चोरला गेली भाग 9 बघणार आहोत भाग आठ मध्ये बघितले होते आपण की प्रतिवादी क्रमांक एक दोन यांनी कशा स्वरूपाचे यांचा जबाब न्यायालयामध्ये सादर केला होता आज आपण पंचनामेसाठी निघालेले तहसीलदार साहेबांचे जे पत्र होते ते पत्राचे स्वरूप बघणार आहोत तसेच ग्रामपंचायत ने दिलेल्या स्वरूपाचे पत्र त्या पत्राचे स्वरूप देखील बघणार आहोत त्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठला प्रकार खोटा आणि कुठला प्रकार खरा आहे तो चला तर मग यापुढील लेखाला सुरुवात करूया दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी तहसील कार्यालय पैठण जिल्हा औरंगाबाद जावक क्रमांक 2020 जमाबंदी एक कावी 498 मंडळ अधिकारी विभाग बिडकीन तसेच तलाठी सज्जा मारोळा तालुका पैठण त्यानंतर विषय आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफन भूमी वरील अतिक्रमण हटवणे बाबत त्यानंतर संदर्भ. श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर वाडी तालुका पैठण यांचे निवेदन दिनांक 24 /2/2020 पुढे उपरोक्त विषयी कळविण्यात येते की श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर तालुका पैठण यांनी या कार्यालयास निवेदन सादर करून मौजे इमामपूर वाडी येथील गट नंबर 44 च्या बाजूला असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफन भूमीवरील अतिक्रमण हटविणे बाबत विनंती केली आहे करिता प्रकरणात मौजे इमामपूर वाडी येथील गट नंबर 44 चे बाजूला असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची दफन भूमी स्मशानभूमीची पाहणी करण्यात यावी सदर ठिकाणी वापरात असलेल्या स्मशानभूमीचे जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे अतिक्रमण काढण्यात यावे तसा अहवाल पंच नाम्यासह या कार्यालयास सादर करण्यात यावा..... प्रतिलिपी श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर वाडी तालुका पैठण यांना माहितीस्तव...... नंतर तहसीलदार साहेबांची स्वाक्षरी.... आता यानंतर ग्रामपंचायतीने दिलेल्या लेखी स्वरूपाच्या पत्रात त काय विवरण आहे ते आपण बघूयात दिनांक 5/3/2021 हे सर्व ग्रामपंचायतच्या लेटरहेड वरती आहे मित्रांनो विषय भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी दफनभूमी बाबतची सध्याची परिस्थिती माननीय मंडळ अधिकारी तहसील कार्यालय पैठण यांचे मार्गदर्शनानुसार दिनांक 4/11/2020 रोजी मौजे इमामपूर येथे तलाठी व ग्रामसेवक तसेच गावकरी यांच्या उपस्थितीत भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी दफनभूमी बाबत स्थळ ठिकाणी बैठक झाली त्यानुसार संबंधित जागेची मोजणी करून दफनभूमीची जागा गट नंबर 44 ची साहेबराव यादव प्रधान यांच्या जागेची मोजणी करून हद्द कायम करण्याचे ठरलेले होते दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मोजणी करण्याचे ठरले होते दोन्ही पक्षाकडून मोजणीसाठी तयारी दर्शवली होती परंतु सौद्रपदाबाई साहेबराव प्रधान यांनी मोजणीच तयारी दर्शवली नाही तेव्हा माननीय मंडळ अधिकारी तहसील कार्यालय पैठण यांनी याबाबत लक्ष देऊन पुढील कारवाही करावी व सदर प्रकरण सोडण्यात यावे अशी मागणी केलेली आहे तेव्हा पुढील कारवाईस्तव सविनय सादर त्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच यांचा सही आणि ग्रामपंचायत शिक्का.....हे होते ग्रामपंचायतचे लेखी स्वरूपाचे पत्र आणि त्या मधला मजकूर आता तुम्हीच विचार करा सविस्तर आता एवढे सगळे शासकीय कागदाचे पुरावे असल्यानंतर माझ्यासारखा बॅकवर्ड क्लास मधला व्यक्ती कोर्टात खोटा खटला दाखल करायची हिंमत करू शकतो का ? नकळतच तुमचे उत्तर असेल कसं शक्य आहे ? मग अशी सध्याची परिस्थिती तयार झालेली आहे कारण पुढे जे  ते होईलच आणि विचार करण्यासारखे आहे ना मग रात्रंदिवस देवाला भजनारी  माणसं किती सत्य परिस्थितीचा काटेकोरपणे पालन करतात हे आपल्या लक्षात येते आणि हो यांना कुठेतरी भीती तयार झाली आहे त्यामुळे सैरा वैरा काहीही बोंबलत आहेत...... चला तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया भाग 10 मध्ये आदिवासी दफन भूमी चोरला गेली भाग 10 जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी.........

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग....8

नमस्कार मित्रांनो काल दिनांक 25/ 9/ 2023 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग 7 बघितलेला आहे आणि आज दिनांक 26 /9/ 2023 रोजी आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग.8. बघणार आहोत मित्रांनो भाग सात मध्ये आपण बघितले की कशा पद्धतीचे उलट सुलट स्टेटमेंट हे दूषित विचारांचे लोक देतायेत तसेच न्यायालयात यांनी जे स्टेटमेंट दिलेले आहे ती स्टेटमेंट ची कॉपी मी आज सविस्तर भाग.8. मध्ये घेतोय ते स्टेटमेंट वाचल्यानंतर तुमच्या देखील लक्षात येईल किती मूर्ख प्रवृत्तीचे लोक आहेत कितीतरी प्रश्न तुमच्या मनामध्ये माझ्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतात चला तर मग जास्त वेळ न गमावता मी पुढील लेखाला सुरुवात करतो आता स्टेटमेंट यांच्या म्हणण्यानुसार कसे आहे ते बघा सर्वप्रथम तुम्हाला देखील कळाले पाहिजे की प्रकरण चालू कुठे आहे व कुठल्या स्तरावर आहे माननीय .दिवाणी न्यायाधीश साहेब , क. स्तर, पैठण यांचे न्यायालय आणि खटला क्रमांक. दी. मु. नंबर 136/2021आणि आता प्रतिवादी नंबर एक आणि दोन यांचे लेखी म्हणणे बघा सविस्तर मुद्दा क्र.  1)....असे की प्रतिवादी विरुद्ध प्रस्तुत चा दावा व अर्ज निष्कर्ष क्रमांक 5 देण्याचे कायदेशीर असे काही कारण नव्हते व नाही तसा त्याला हक्क अधिकार व locus stand नाही आणि वादीचा दावा व अर्ज निष्कर्ष क्रमांक पाच कायद्याने चालू शकत नाही सबब ते खर्चासह खारीज होणे न्याय व योग्य होईल . मुद्दा क्रमांक 2). हे की डावा कलम नंबर एक व त्या अनुषंगाने अर्ज निष्कर्ष क्रमांक 5. मधील मिळकत वर्णन मौजे इमामपूर तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथील जमीन गट नंबर 44 एकूण क्षेत्र एक हेक्टर 59 आर ह्या हद्दीपर्यंतचे कथन खरे आहे परंतु वादी आदिवासी भिल समाजाची पूर्वापारपासून चालत आलेली गट नंबर 44 च्या पश्चिमेस लागून असलेली 25 आर म्हणजे 25 गुंठे स्मशानभूमी दफन भूमीचे क्षेत्र व त्याच्या दर्शविलेल्या चतुर सीमा व नमो चतुर्थी मे आतील दावा मिळकत वगैरे हे संपूर्ण कथन चूक खोटे व बनावटीचे असून मोघमपणे स्वरूपाचे आहे करिता व मान्य आहे स्पष्टीकरण विशिष्ट विवरणात दिले आहे.. मुद्दा क्रमांक 3).. हे की दावा कलम नंबर २ व त्या अनुषंगाने अर्ज निष्कर्ष क्रमांक 5. मधील कथन मजकूर की दावा मिळकत ही पूर्वापार असून आदिवासी भिल समाजाची स्मशानभूमी दफनभूमी असून वादी तसेच इमामपूर येथील आदिवासी भिल समाज तसेच त्यांचे पूर्वज पूर्वपारपासून आदिवासी समाजाच्या मृत व्यक्तीचे दफनविधी अंतविधी सदरील दावा मिळकतीमध्ये करत आलेले आहेत आजही सदरील दावा मिळकतीमध्ये आदिवासी भिल समाज मृत व्यक्तीचे दफन विधी करत आहेत वगैरे हा संपूर्ण कथन मजकूर व दाखल फोटो चूक खोटे बनावटीचे असून दिशाभूल करणारे आहे करिता अमान्य आहे स्पष्टीकरण विशिष्ट विवरणात दिले आहे. मुद्दा क्रमांक 4.) दावा कलम नंबर 3. क्रमांक एक यांची गट नंबर 44 मध्ये एक हेक्टर 59 आर पैकी 39 आर एवढे क्षेत्र आहे इतर प्रतिवादी क्रमांक तीन ते बारा यांना यांनी गट नंबर 44 ऐवजी दावा मिळकत स्मशानभूमी दफनभूमी येथे सदरील विहीर खोदून पेरणी करून अंत्यविधीनंतर केलेल्या दगड तांदळाच्या खुणा नष्ट करून दावा मिळकतीमध्ये हरकत अडथळा करत आहेत प्रत्यक्ष दावा मिळकत ही प्रतिवादी क्रमांक 1 च्या गट नंबर 44 मधील मालकी व ताब्यातील क्षेत्राच्या पश्चिमेस आहे परंतु प्रतिवादी हे गट नंबर 44 मधील एक हेक्टर 59 आर क्षेत्राच्या व्यतिरिक्त आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी दफनभूमीत दावा मिळकतीमध्ये हरकत अडथळा करत आहेत वगैरे हा संपूर्ण कथन मजकूर चूक खोटा व बनावटीचा असून दिशाभूल करणारा आहे तसेच चार गुंठे क्षेत्राचा दाखल फेरफार याबाबतची शहानिशा पुराव्या वेळी होईल करिता अमान्य आहे स्पष्टीकरण विशिष्ट विवरणात दिले आहे आता पॅरेग्राफ क्रमांक सहा मध्ये प्रतिवादी क्रमांक एक आणि दोन हे काय म्हणतात बघा..👉.. आदिवासी भिल समाजाच्या वतीने वादी चे वडील म्हणजे.मी किरण सखाराम बर्डे यांचे वडील सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल समाज मौजे इमामपूर वाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद यांनी दिनांक 24 /2/ 2020 रोजी दावा मिळकत आदिवासी भिल समाजाची स्मशानभूमी दफनभूमीवरील अतिक्रमण हटवणे बाबत तहसीलदार साहेब तहसील कार्यालय पैठण यांना अर्ज केला होता सदरील अर्जाच्या अनुषंगाने तहसीलदार साहेब पैठण यांनी मौजे इमामपूर वाडी येथील गट नंबर 44 च्या बाजूला असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफनभूमीची पाहणी करण्यात येऊन सदर ठिकाणी वापरात असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे अतिक्रमण काढून तसा अहवाल पंचनामा सादर करण्याचे आदेश मंडळ अधिकारी व तलाठी सजा मारोळा तालुका पैठण यांना दिनांक 22/9/2020 नऊ रोजी आदेशित केले होते वगैरे या संपूर्ण कथन मजकुराबाबत या प्रतिवादींना माहिती नाही सबब नमूद मजकूर बाबी वादिने पुराव्यासह सिद्ध करणे गरजेचे आहे स्पष्टीकरण विशिष्ट विवरणात दिले आहे. आता पॅरेग्राफ क्रमांक 7.. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय पैठण यांच्या २२/९/२०२० आदेशानुसार प्रत्यक्ष स्थळ पाणी चौकशी तसेच गट नंबर 44 च्या सात बारा उताऱ्याचे अवलोकन करून प्रतिवादी क्रमांक एक यांची गट नंबर 44 मध्ये 36 आर जमीन असून सदरील जमिनीच्या पश्चिमेस पूर्वी पार वहिवाटीप्रमाणे इमामपूर येथील आदिवासी भिल समाजाचे लोक दफन विधी करतात असे दिनांक 4/ 11/ 2020 रोजी च्या पंचनाम्यात नोंदवले आहे मात्र आदिवासी बिल समाजाची स्मशानभूमी दफनभूमी व प्रतिवादी यांच्या मालकी ताब्यातील क्षेत्र यांच्यामधील हद्दीच्या खुणा नष्ट करून प्रतिवादी हे दावा मिळकतीमध्ये हरकत अडथळा करत आहेत असे पंचनाम्यात असलेले वर्णन वगैरे हा संपूर्ण कथन व मजकूर या महाशयांना खोटा वाटतोय चला तर मित्रांनो या पुढील भाग क्रमांक 9.उद्या लवकरच घेऊन येईल आदिवासी द फन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 9..जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम🙏 जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग.......8......

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

आदिवासी दफनभूमी// स्मशानभूमी चोरला गेली भाग 7.......

🙏नमस्कार मित्रांनो काल दिनांक 24/ 9 /2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग सहा बघितला होता आज दिनांक 25 /9/ 2023 रोजी आदिवासी दफन भुमी चोरीला गेली भाग 7 बघणार आहोत भाग सहा मध्ये आपण बघितले होते की साहेबराव प्रधान यांचे कशा पद्धतीने दुखद निधन झाले होते कोर्टात हजर झाल्याच्या नंतर आता डोक्यात असा प्रश्न पडला की जो प्रतिवादी होता की तोच एक्सपायर झाल्यानंतर हा खटला चालवायचा कसा परंतु यामध्ये देखील कायदेशीर पद्धती आहेत प्रतिवादी जर मयत झाले तर प्रतिवादींची पत्नी आणि त्यांचे वारस यांना देखील कायद्याच्या चौकटीत उभा करता येऊ शकते आणि आपण देखील तेच केले मी ज्यावेळेस आदिवासी दफन भूमीच्या संदर्भात खटला न्यायालयात दाखल केला होता त्याच वेळेस साहेबराव यादव प्रधान यांची पत्नी द्रोपदाबाई साहेबराव प्रधान व मुलगा राजू  साहेबराव प्रधान यांचे  आधीच नाव टाकले होते त्यामुळे यांना देखील साहेबराव प्रधान यांना ज्यावेळेस न्यायालयाचे नोटीस गेले त्याच वेळेस यांना देखील नोटीस निघाले होते परंतु मित्रांनो या सर्व प्रकरणांमध्ये अति महत्त्वाची भूमिका बजावलेलं कॅरेक्टर त्यांच्या संदर्भात तुम्हाला थोडेसे दोन शब्द सांगायचं विसरून गेलो  ते म्हणजे माझे आदरणीय पुज्य आणि गुरू मानलेले शिवानंद टाकसाळे साहेब साहेबांनी मला वारंवार कशा पद्धतीने कार्यप्रणाली करायची व कशा पद्धतीने पाठपुरावा करायचा आहे वारंवार साहेबांनी मला सांगितले व सुचवले या प्रकरणांमध्ये जर गरिबांचे कैवारी म्हणून माझ्या सोबत अडचणीत उभा राहिले ते म्हणजे आपले माननीय शिवानंद टाकसाळ साहेब त्यावेळेस ते औरंगाबादला विभागीय आयुक्त या पदावर होते आणि त्यांचं काम देखील खूप स्टेट फॉरवर्ड असायचं त्यांच्याकडे जर गरिबांच्या संदर्भात कुठले प्रकरण जर गेले कधी तरी तात्काळ त्यावर ॲक्शन घेत असत साहेबांची ओळखच त्यांच्या कामामुळे ते अतिशय प्रेमळ स्वभाव तसेच कायद्याच्या दृष्टिकोनातून खूप चतुर आणि हुशार देखील परंतु दुर्दैव असं झालं की साहेबांनी या प्रकरणांमध्ये स्टेट फॉरवर्ड ॲक्शन घेते वेळेसच साहेबांची बदली दुसऱ्या स्टेट ला बदली झाली नाही तर आपल्याला न्यायालयात देखील येण्याची गरज पडली नसते असो ते आपलंच दुर्दैव समजावे लागेल साहेबराव प्रधान आणि त्यांच्या वारसांना नोटीस निघाल्यानंतर ते हजर झाले त्यांचे लेखी स्वरूपाचे जबाब देखील न्यायालयात नोंदवले गेले मी त्यांच्या छायांकित प्रती काढून त्यांच्या जबाब मधे त्यांनी मला कशा पद्धतीने रेती माफियामध्ये उल्लेख केला होता आणि कशा पद्धतीने माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व कशा पद्धतीने मला मानसिक तणावातून जावं लागलं अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्यासोबत घडल्या मित्रांनो तरी देखील आपण माघार घ्यायची नाही प्रयत्न आपल्या सतत चालू असणार कारण आपली दफनभूमी हक्काची नाही कुणाच्या बापाची 1968 पासून जातीवाचक इमांपूर गावात पद्धतीचा स्वभाव दिसून येत आहे कारण त्यावेळेस आदिवासी भील समाजाला शिक्षण नव्हतं आणि शिक्षण नसल्याकारणाने आपला समाज भित्र्या स्वरूपाची वागणूक होती परंतु आता सध्याच्या काळामध्ये खूप काही मुलं शिकलेले आहेत आणि घेका .दे .करणाऱ्या स्वभावाचे आहेत त्यामुळे बऱ्यापैकी फरक या दूषित विचारसरणीच्या लोकांना पडलेला आहे आणि यांना चोप देखील बस लेला आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यानंतर जे उर्वरित मंडळी होती विहिरींची रजिस्ट्री करून घेणारे विहिरीसाठी जागा विकत घेणारे हे देखील हळूहळू न्यायालयात हजर होऊ लागले व त्यांचे लेखी स्वरूपाचे स्टेटमेंट देऊ लागले त्यांच्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी विशेष असं काही दिलं नव्हतं त्यांचं म्हणणं फक्त एकच पडलं की आम्हाला माहीत नव्हतं की सदरील गटामध्ये आदिवासी समाजाची दफनभूमी आहे म्हणून आम्ही फक्त विहिरीसाठी जागा घेतलेली आहे आणि ती जागा आम्ही साहेबराव यादव प्रधान यांच्याकडून घेतलेली आहे तसेच त्यांनी रजिस्ट्रेशन नकला देखील न्यायालयाकडे सादर केल्या आता आपल्यापुढे फक्त प्रश्न एकच आहे मित्रांनो की आपण एवढी सगळी खटाटोप करून न्यायालय पर्यंत धाव घेतली तर आपलं फक्त म्हणणं एवढंच आहे की गट नंबर 44 च्या लगत असलेले आपली आदिवासी समाजाची दफन भूमी तिचे अतिक्रमण हटवण्यात यावे न्यायालयाने साहेबराव यादव प्रधान यांच्या मालकीची असलेली जमीन 39 गुंठे याची तात्काळ मोजण्याचे आदेश व्हावे यासाठी आपण वारंवार प्रयत्न करत आहोत अशा बऱ्याचश्या मोठमोठाल्या प्रसंगातून अजून आपल्याला निघायचं आहे माझ्या गावापासून पैठण सुमारे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे दर महिन्याला तारीख येणार हेरिंगला हजर होणे कारण आपला संघर्ष तर चालूच राहणार आणि आपण दफनभूमीसाठी खूप तर प्रयत्न करतच आहोत अजूनही देखील प्रयत्न करणार आहोत न्यायालयामध्ये आल्यानंतर समोरील प्रतिवादी व्यक्ती हजर झाल्याच्या नंतर खुन्नस देणे खुन्नस देऊन बघणे दबावात घेणे मानसिकता तणावात घेणे राजकारणी लोकांच्या माध्यमातून माझ्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करणे असे बरेच प्रकार त्यांनी चालू केले परंतु आपण माघार घेतली नाही आपले प्रयत्न आपण सदैव तत्पर पद्धतीने चालू ठेवले बाकी जो काही निर्णय देन तो न्यायालयाचे कामं आहेत आपण आपले प्रयत्न वारंवार चालू ठेवणार त्यानंतर उर्वरित लोकांच्या स्टेटमेंट मध्ये कशा पद्धतीने यांच्या यांच्या स्टेटमेंट खालीवर झाले आणि यांच्या यांच्यात गोंधळ निर्माण झाला यावर देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कारण विहिरीसाठी रजिस्ट्रीला जागा विकत घेणारी लोक जी होती ती ईतर गावातली होती आता यांच्यात गोंधळ असा झाला की दुसऱ्या गावातील व्यक्तींचे म्हणणे पडले व तुम्ही प्रॉपर गावातील माणसं असून तुम्हाला माहीत नव्हतं का की ती आदिवासी समाजाची दफन भूमी आहे म्हणून मग तुम्ही कसं काय त्यांच्या दफन भूमीमध्ये विहिरी खोदल्या आणि आम्हाला  देखील जागा घ्यायला लावली आणि विहिरी खांदायला लावल्या असे बरेचसे प्रसंग तिथे घडू लागले कारण इमामपूर मधील दूषित विचारांच्या लोकांना कळू लागलं की आता आपलं इथं पितळ उघड पडत चाललेलं आहे म्हणून वाट फक्त आपण एकच बघायची ज्यावेळेस न्यायालयाच्या निदर्शनास ही गोष्ट येईल त्यावेळेस या लोकांवर सरळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 च्या कायद्यानुसार आपण यांच्यावर गुन्हा दाखल करायची मागणी करणार यांना देखील कळायला पाहिजे की आदिवासी समाजाला त्रास दिल्यानंतर कायघडतं म्हणून त्यासाठी मी माझे जे काही प्रयत्न असेल माझ्या सहकारांची जी काही मदत लागेल ती घेईलच आणि प्रयत्न देखील चालू ठेवू वेळ पडली सेवा विधी प्राधिकरणामध्ये देखील हे प्रकरण दाखल करू पण त्यामध्ये स्टेप आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे  आणि  आपण सत्र न्यायालयात देखील जाऊ चला तर मित्रांनो तुमचे वारंवार असेच या लेखाच्या माध्यमातून मिळत असलेले प्रेम भावना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत असेच आपले प्रेम सदैव माझ्यावर राहू द्या अशी मी प्रत्येकाकडून अपेक्षा करतो जय आदिवासी जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद भेटूया नंतर पुढील भाग 8. मध्ये लवकरच.......

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...