 |
|
नमस्कार मित्रांनो काल दिनांक 26/ 9/ 2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग आठ बघितला होता आणि आज दिनांक 27 /9/ 2023 रोजी आपण आदिवासी दफन भूमी चोरला गेली भाग 9 बघणार आहोत भाग आठ मध्ये बघितले होते आपण की प्रतिवादी क्रमांक एक दोन यांनी कशा स्वरूपाचे यांचा जबाब न्यायालयामध्ये सादर केला होता आज आपण पंचनामेसाठी निघालेले तहसीलदार साहेबांचे जे पत्र होते ते पत्राचे स्वरूप बघणार आहोत तसेच ग्रामपंचायत ने दिलेल्या स्वरूपाचे पत्र त्या पत्राचे स्वरूप देखील बघणार आहोत त्यामुळे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठला प्रकार खोटा आणि कुठला प्रकार खरा आहे तो चला तर मग यापुढील लेखाला सुरुवात करूया दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी तहसील कार्यालय पैठण जिल्हा औरंगाबाद जावक क्रमांक 2020 जमाबंदी एक कावी 498 मंडळ अधिकारी विभाग बिडकीन तसेच तलाठी सज्जा मारोळा तालुका पैठण त्यानंतर विषय आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफन भूमी वरील अतिक्रमण हटवणे बाबत त्यानंतर संदर्भ. श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर वाडी तालुका पैठण यांचे निवेदन दिनांक 24 /2/2020 पुढे उपरोक्त विषयी कळविण्यात येते की श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर तालुका पैठण यांनी या कार्यालयास निवेदन सादर करून मौजे इमामपूर वाडी येथील गट नंबर 44 च्या बाजूला असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची स्मशानभूमी दफन भूमीवरील अतिक्रमण हटविणे बाबत विनंती केली आहे करिता प्रकरणात मौजे इमामपूर वाडी येथील गट नंबर 44 चे बाजूला असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाची दफन भूमी स्मशानभूमीची पाहणी करण्यात यावी सदर ठिकाणी वापरात असलेल्या स्मशानभूमीचे जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे अतिक्रमण काढण्यात यावे तसा अहवाल पंच नाम्यासह या कार्यालयास सादर करण्यात यावा..... प्रतिलिपी श्री सखाराम बंडू बर्डे व इतर आदिवासी भिल्ल समाज मौजे इमामपूर वाडी तालुका पैठण यांना माहितीस्तव...... नंतर तहसीलदार साहेबांची स्वाक्षरी.... आता यानंतर ग्रामपंचायतीने दिलेल्या लेखी स्वरूपाच्या पत्रात त काय विवरण आहे ते आपण बघूयात दिनांक 5/3/2021 हे सर्व ग्रामपंचायतच्या लेटरहेड वरती आहे मित्रांनो विषय भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी दफनभूमी बाबतची सध्याची परिस्थिती माननीय मंडळ अधिकारी तहसील कार्यालय पैठण यांचे मार्गदर्शनानुसार दिनांक 4/11/2020 रोजी मौजे इमामपूर येथे तलाठी व ग्रामसेवक तसेच गावकरी यांच्या उपस्थितीत भिल्ल समाजाच्या स्मशानभूमी दफनभूमी बाबत स्थळ ठिकाणी बैठक झाली त्यानुसार संबंधित जागेची मोजणी करून दफनभूमीची जागा गट नंबर 44 ची साहेबराव यादव प्रधान यांच्या जागेची मोजणी करून हद्द कायम करण्याचे ठरलेले होते दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मोजणी करण्याचे ठरले होते दोन्ही पक्षाकडून मोजणीसाठी तयारी दर्शवली होती परंतु सौद्रपदाबाई साहेबराव प्रधान यांनी मोजणीच तयारी दर्शवली नाही तेव्हा माननीय मंडळ अधिकारी तहसील कार्यालय पैठण यांनी याबाबत लक्ष देऊन पुढील कारवाही करावी व सदर प्रकरण सोडण्यात यावे अशी मागणी केलेली आहे तेव्हा पुढील कारवाईस्तव सविनय सादर त्यानंतर ग्रामसेवक आणि सरपंच यांचा सही आणि ग्रामपंचायत शिक्का.....हे होते ग्रामपंचायतचे लेखी स्वरूपाचे पत्र आणि त्या मधला मजकूर आता तुम्हीच विचार करा सविस्तर आता एवढे सगळे शासकीय कागदाचे पुरावे असल्यानंतर माझ्यासारखा बॅकवर्ड क्लास मधला व्यक्ती कोर्टात खोटा खटला दाखल करायची हिंमत करू शकतो का ? नकळतच तुमचे उत्तर असेल कसं शक्य आहे ? मग अशी सध्याची परिस्थिती तयार झालेली आहे कारण पुढे जे ते होईलच आणि विचार करण्यासारखे आहे ना मग रात्रंदिवस देवाला भजनारी माणसं किती सत्य परिस्थितीचा काटेकोरपणे पालन करतात हे आपल्या लक्षात येते आणि हो यांना कुठेतरी भीती तयार झाली आहे त्यामुळे सैरा वैरा काहीही बोंबलत आहेत...... चला तर मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया भाग 10 मध्ये आदिवासी दफन भूमी चोरला गेली भाग 10 जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा