नवीन योजना, नविन महिती, ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी कसे काम करावे आणि लेखी तक्रार अर्ज. आदिवासी क्रांतिकारक यांची महिती, समाज जनजागृती, ग्रामपंचायत मधील महिती घरकुल विभागातील कागद पत्रे, महिती आणि खेळ तसेच कायद्याची अमलबजावणीसाठी कसे काम करावे सर्व अर्ज प्रक्रिया, निवेदन तयार करणे संदर्भ आणि बरेच काही
रविवार, १३ एप्रिल, २०२५
आदिवासी भिल समाज अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित?
धोकेबाज मैत्रीण
याच पार्श्वभूमीवर, पुण्यात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यात एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला फसवून बुधवार पेठेतील वेश्याव्यवसायात विकण्यात आले. या घटनेतून पुन्हा एकदा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे. बुधवार पेठेतून ती थेट पोलिस स्टेशनला गेली, अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या गोष्टीने पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या सोबत पुण्यात आली होती. मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून तिला फसवून घात केला. बांगलादेशातून नदीमार्गे बेकायदेशीरपणे तिला भारतात आणलं गेलं. सुरुवातीला त्या दोघी भोसरी भागात काही दिवसांसाठी राहिल्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे ३ लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार तिला समजला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.
तिला विकल्यानंतर संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं, तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील. या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं गेलं.
पाच महिने अत्याचार सहन केले, त्यानंतर तिने योग्य संधी आणि वेळ मिळताच 7 एप्रिल रोजी तिथून पळ काढला. बस आणि रिक्षामार्गे ती हडपसरपर्यंत पोहोचली आणि तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फरासखाना पोलिसांकडे प्रकरण वर्ग केलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल केला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत 🙏 .,✍️✍️✍️✍️ आदिवासी जमात विकास परिषद महाराष्ट्र राज्य...📌 संस्थापक अध्यक्ष. किरण सखाराम बर्डे..
आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 14
शनिवार, १२ एप्रिल, २०२५
माहिती कामाची
नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रामीण भागासाठी शेतकरी बंधूंना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पन्नासाठी दुग्धजन्य जनावरांचा समावेश दैनंदिन जीवनात असणं खूप महत्त्वाचा आहे आणि ज्या शेतकरी बांधवांकडे दुग्धजन्य जाणारे आहेत त्यांच्यासाठी शासनाची गोठा योजना चालू झालेली आहे तरी शेतकरी बांधवांनी आपल्या ग्रामपंचायतला आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या शेतात काळ संपर्क साधून नियमावलीनुसार कागदपत्र सादर करून आपला अर्ज लवकरात लवकर दाखल करावाआदिवासी दफन भूमी चोरीला गेले भाग 13
रविवार, २८ जुलै, २०२४
शबरी घरकुल योजनेची सविस्तर माहिती व लागणारे कागदपत्र.
शबरी घरकुल मंजूर कसे करावे ? याची सविस्तर माहिती. नमस्कार मी आदिवासी जमात विकास परिषदेचा संस्थापक अध्यक्ष किरण सखाराम बर्डे आज आपण बघणार आहोत की शबरी घरकुल कशा पद्धतीने मंजूर करता येते यावर सविस्तर माहिती आपण बघणार आहोत बऱ्याच नागरिकांना शबरी घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यावा ते कसे मंजूर होईल त्यासाठी कागदपत्र काय लागतील असे बरेचसे प्रश्न निर्माण होतात परंतु या सर्व पद्धतीचा पाठपुरावा करता करता काही लाभार्थ्यांचे घरकुल रद्द होतात. चला तर मग यासाठी लागणारे कागदपत्राची माहिती बघू 1). आधार कार्ड झेरॉक्स 2). बँक पासबुक झेरॉक्स 3) जात प्रमाणपत्र झेरॉक्स 4). उत्पन्न प्रमाणपत्र झेरॉक्स .5) विहित नमुन्यातील अर्ज. 6) पासपोर्ट साईज फोटो .7) ग्रामपंचायत ठराव असे वरीलपैकी सर्व कागदपत्र तयार करून विहित नमुन्यातील अर्ज भरून ग्रामपंचायत ठराव मध्ये नाव घेऊन आपल्या ग्रामपंचायत मधील संबंधित ग्रामसेवकांकडे आपण ते जमा करायचे आहे कागदपत्र व अर्ज जमा केल्याच्या नंतर संबंधित ग्रामसेवक यांची नैतिक जबाबदारी असते की त्यांनी संबंधित पंचायत समिती येथे पूर्ण शबरी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रस्ताव दाखल करायचा असतो पंचायत समिती येथे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर पंचायत समिती येथे आपण दिलेल्या कागदपत्राची प्रस्तावाची पडताळणी होत असते म्हणजेच छाननी प्रक्रिया सुरू होत असते पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या विहित नमुन्यातील अर्ज म्हणजे पाहिली पुढील वरिष्ठ स्तरावरती पाठवण्यात येतात अशा पद्धतीने आपण शबरी घरकुल योजनेसाठी लागणारे कागदपत्रे आणि त्यासाठी कोणती पद्धत अवलंबायची आहे त्यानुसार याची सविस्तर माहिती बघितलेली आहे माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा…जय हिंद जय आदिवासी जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम……
बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३
आदिवासी दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेले भाग-12..
नमस्कार मित्रांनो दिनांक 29/ 9 /2023 रोजी आपण दफन भूमी स्मशानभूमी चोरीला गेली भाग 11 बघितला होता त्यानंतर आज दिनांक 4/ 10 /2023 रोजी आपण आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग बारा बघणार आहोत त्यापूर्वी तुमची सर्वांची क्षमा मागतो मित्रांनो की 29 ते चार तारखेपर्यंत खूप काही कामत व्यस्त असल्यामुळे मी भाग 12 तयार करू शकलो नाही या चार दिवसाच्या दरम्यान मला थोडा उशीर झाला त्यामध्येच आपले माझ्यावरती असलेले आशीर्वाद व प्रेम दिसून आले कारण मला खूप जणांनी पर्सनली माझ्या फोन नंबर वर फोन करून विचारपूस झाली सदर पुढचा भाग तुम्ही केव्हा तयार करणार आहोत आणि मी यासाठी केलेला संघर्ष व समाजासाठी दिलेला वेळ याचं देखील बऱ्यापैकी कौतुक करण्यात आलं त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनापासून ऋणी आहे आपले सदैव असेच प्रेम माझ्यावरती राहू द्या यापेक्षा करतो 🙏चला तर मित्रांनो आदिवासी दफनभूमी चोरीला गेली भाग १२ सुरू करूयात आज दिनांक 4/ 10 /2023 रोजी भाग 11 मध्ये आपण बघितले होते की प्रतिवादी साहेबराव प्रधान यांनी स्वतः 2011 मध्ये वादी बनवून स्वतः न्यायालयात खटला दाखल केला होता दीड ते दोन वर्षे तो खटला न्यायालयामध्ये चालू होता परंतु न्यायालयात सबळ पुरावे सादर न झाल्यामुळे न्यायालयाने तो खटला खरीज केला होता म्हणजे अक्षरशः डोके चक्रावून टाकणारा प्रसंग आणि घटना दैनंदिन जीवनामध्ये घडत आहेत परंतु सर्वसामान्य जनतेला आपल्या दैनंदिन कामातून व कुटुंबातील जबाबदारीतून व कर्तव्यातून वेळ मिळत नाही म्हणून समाजात याचे बांडगुळे तयार होतात आणि गरीब लोकांना फसवण्याचे काम करतात कारण या प्रसंगावरून एक लक्षात येते की आपण जर शिकलं नाही तर आपण अधोगती कडे नक्की जाणार आणि याच लाजिरवाणी आणि दुबळ्या पानांचा फायदा हे लोक घेत असतात कारण यामध्ये बऱ्यापैकी लोक आदिवासी भील समाजाला सहकार्य सपोर्ट आणि मदत देखील करतात परंतु आमच्या इमामपूर गावामध्ये असे बोटावर मोजणे इतके महान व्यक्तिमत्व आहे किती त्यांचा संसार ग्रामपंचायत च्या जीवावर चालवण्यासाठी पंचायत मध्ये आणि इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात परंतु मित्रांनो एक विषय लक्षात येत नाही की माणसाचे विचार एवढे कसे गडूळ असू शकतात माणसाची बुद्धी एवढी कशी शेण खाल्ल्या सारखी चालू शकते असो तो दुसरा प्रसंग आ हे तो मी सविस्तर चर्चा करणार आहे. आता मूळ मुद्याला येतो आता पराग्राफ नंबर 7... हे की दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास प्रतिवादीचा असाच हरकत अडथळा चालू राहिल्यास दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी उपभोगासारख्या मौल्यवान हक्कावर गदा येईल व त्यापासून वादी वंचित होईल परिणामी वादीचे अपरिमित असे नुकसान होईल ज्याची भरपाई प्रतीवादी करु शकणार नाही अशा परिस्थितीत दावा मिळकतीवरील वादीच्या कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळा होईल तसेच दावा मिळकतीमध्ये स्मशानभूमी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य प्रतिवादीने करू नये असा वादीला प्रतिवादी विरुद्ध निरंतरचा मनाई हुकूम मिळणे न्याय व जरुरीचे आहे पॅरेग्राफ क्रमांक आठ हे की वादीचा दावा निरंतर मनाई हुकुम मिळणेबाबतचा असल्यामुळे वादीने त्यासाठी ठराविक कोर्ट फीज रुपये 200 दिले आहे जी योग्य व पुरेशी आहे मेहरबान कोर्टाच्या आर्थिक मर्यादेसाठी प्रोसेस व इत्यादीसाठी वादीने दाव्याची किंमत रुपये एक हजार रुपये केली आहे मेहरबान कोर्टात सदरचा दावा चालविण्याचा अधिकार आहे वादीचा दावा प्रतिवादी विरुद्ध खालील प्रमाणे खर्चासह डिग्री करण्यात यावा दाव्याचे कलम नंबर एक मध्ये वर्णन केलेल्या दावा मिळकतीवरील वादीच्या मालकी कब्जा हक्कास व उपभोगास हरकत अडथळा होईल तसेच दावा मिळकतीमध्ये स्मशानभूमी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य प्रतिवादीने स्वतः अथवा त्यांचे हस्तक किंवा अन्य कोणाही मार्फत करू नये असा वादीला प्रतिवादीन विरुद्ध निरंतर चा मनाई हुकूम मिळावा ब... वादीला प्रतिवादीकडून या दाव्याचा खर्च व अन्य अनुषंगिक योग्य ती दात मिळण्याचा हुकूम व्हावा.... मित्रांनो हे होते साहेबराव प्रधान यांनी 2011 मध्ये वादी बनवून आदिवासी भिल समाजातील चार व्यक्तींवर खटला दाखल केला होता त्या दाव्याच्या संदर्भातले टोटल विवरण मी तुमच्यासमोर सादर केलेले आहे तसेच आता प्रश्न डोक्यात असा आला की यांना जर यांना जर खर्चासकट नुकसान भरपाई की दावा पाहिजे मग आता 68 च्या पूर्वीपासून आमचा आदिवासी भिल समाज सदरील ठिकाणी अंत्यविधी व दफन विधी करत आलेला आहे आता या दाव्यामध्ये असलेले 2021 च्या दाव्यात असलेले असलेले नमुने यांच्याकडून देखील आपण नुकसान भरपाई की दवा केला पाहिजे तसेच यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायदा 1889 तसेच सुधारणा आवृत्ती 2014 नुसार अट्रा सिटी चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्या विरोधात मी न्यायालयामध्ये कोर्ट कमिशन देखील मागायची प्रोसेस केली पाहिजे मग या भाऊंना समजेल की कायदा आणि सुव्यवस्था हे यांना कळेल चला भेटूया पुढच्या भागांमध्ये आदिवासी दफन भूमी चोरीला गेली भाग 13 मध्ये निश्चितच पुढील विषयावर चर्चा करूयात तोपर्यंत सतर्क रहा सावध रहा तसेच आपले प्रियजनांची काळजी घ्या आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय भिम
👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍
👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...
-
नवरात्राच्या पार्श्वभूमीवर पारधी बांधवांचे रक्ताने लिहिलेले पत्र : गायरान जमिनीच्या मागणीसाठी सरन्यायाधीशांना आवाहन ✒️(समाज प्रतिनिधी :अनिल ...
-
👉 नमस्कार सर्व मित्रांना सर्वात प्रथम 🙏जय आदिवासी 🙏जय जोहार 🙏 क्रांतिकारी जय भिम🙏 जय लहुजी🙏 जय शिवराय🙏 चला तर मित्रांनो आज आपण घेऊन ...
-
खूप चांगला हा प्रश्न 🤔 “गावठाण”, “पांदण रस्ता”, “हद्द”, “रुंदी–लांबी” या संकल्पना सामान्य जनतेला समजावून सांगणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाल...




