https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: क्रांतिवीर राघोजी भांगरे ✌️

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

क्रांतिवीर राघोजी भांगरे ✌️


 क्रांतिवीर राघोजी भांगरे जन्म दिनांक 8 नोव्हेंबर  1805 राघोजींचा जन्म महादेव कोळी जमातीत झाला मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदाऱ्या, वतनदाऱ्या काढल्या परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ. स. 1828 साली. शेत सारा वाढवण्यात आला सारा वसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरीब सावकार, वाण्याकडून भ रमसाठ दराने कर्ज घेऊ लागले कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकवू लागले त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्या विरोधात बंडाला सुरुवात केली इसवी सन १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किंवा पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरात दहशत पसरेल असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकार विरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि पगारातील काटछाट यामुळे राघोजी चिडले आणि नोकरी सोडून त्यांनी बंडात उडी घेतली. पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ. स. 1838 साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले कॅप्टन मंकिटोश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दर्या,घाट रस्ते जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळवली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली परंतु बंडखोर वरमले नाही. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले ब्रिटिशांनी कुमक वाढवले मार्ग रोखून धरले 80 लोकांना कैद केले दहशतीमुळे काही लोक उलटले फंद फितुरीमुळे राघोजींचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजींना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले. ठाणे गॅजेटी यरच्या जुन्या आवृत्तीत लिहिल्याप्रमाणे ऑक्टोंबर 1843 मध्ये राघोजी भांगरे मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरले आणि त्यांनी अनेक दरोडे घातले असा उल्लेख आहे राघू जिने मारवाड्यांवर छापे घातले त्यांनी पोलिसात तक्रार केली ठाव ठिकाण विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजींच्या आईचे निर्दयीपणे हाल केले त्यामुळे चिडलेल्या राघवजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारोड्यांचे नाक कापले राघोजींच्या भयाने मारवाडी गाव सोडून पळाले असा उल्लेख अहमदनगरच्या गॅजेट इयर मध्ये सापडतो. साताऱ्याच्या पदावून खाली झालेल्या छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजा विरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजींचा संबंध असावा असे अभ्यासकांचे मत आहे 🙏🙏🙏 नमस्कार माझ्या सर्व आदिवासी बांधवांना व मित्रांना आपल्या ब्लॉगवर नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट करा 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...