https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: रेल्वेने दिक्षा भूमीला जाणाऱ्या अनुयायांना रोखू नका 👉

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

रेल्वेने दिक्षा भूमीला जाणाऱ्या अनुयायांना रोखू नका 👉


✅दरवर्षी लाखो बौद्ध अनुयायी रेल्वेने दीक्षाभूमीला जातात. याही वर्षी प्रवासाची सुरुवात झालेली आहे. परंतु आजच आमच्याकडे अत्यंत गंभीर तक्रार आली की औरंगाबाद रेल्वे स्टेशन परिसरात काही तरुणांना रेल्वे पोलिसांकडून मारहाण करण्यात आली असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तरुण अतिशय भयभीत होऊन सांगत होते की — “आम्ही दीक्षाभूमीला निघालो होतो, मात्र आम्हाला अन्यायाने अडवण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आलं.”


राज्य सरकारला माहीत आहे की दरवर्षी पाच दिवस रेल्वेने बौद्ध अनुयायी मोफत प्रवास करतात. मग अशा परिस्थितीत रेल्वे पोलिसांकडून त्रास दिला जाणं, मारहाण केली जाणं आणि अडवणूक करणं हा एक उघड उघड छळ आहे. याचा निषेध आम्ही तीव्र शब्दांत करतो.


सरकारने तातडीने रेल्वे विभागाला स्पष्ट आदेश द्यावेत की दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या कोणत्याही बौद्ध अनुयायाला कुठेही अडवले जाणार नाही, मारहाण केली जाणार नाही, त्रास दिला जाणार नाही. जर यापुढे एकाही अनुयायाला रेल्वे पोलिसांकडून वा रेल्वे प्रशासनाकडून छळ झाला, तर त्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटतील याची जबाबदारी राज्य सरकार व केंद्र सरकारवर असेल.


दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या लाखो अनुयायांना सन्मानपूर्वक, चांगल्या पद्धतीने वागणूक देणे ही सरकारची जबाबदारी आहे. याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. कुणालाही त्रास होऊ नये म्हणून तातडीने रेल्वे विभागाला आदेश द्यावेत, अशी आमची ठाम मागणी आहे.


#AllindiaPantherSena 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...