https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9617618308777656 Kiran Barde new tricks and update: दफन भूमी /स्मशान भूमी चोरीला गेली

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

दफन भूमी /स्मशान भूमी चोरीला गेली

नमस्कार मित्रांनो आज आपण आदिवासी समाजाच्या एका खूप मोठ्या समस्या विषयी चर्चा करणार आहोत ही काही मनानं बनवलेली स्टोरी किंवा काल्पनिक गोष्ट किंवा घटना नाही १९६८ च्या आधीपासून आदिवासी समाजाचे अशीच एक समस्या निर्माण झालेली आहे ती म्हणजे इमामपूर या गावात असलेला भील समाज त्यांच्यासोबत घडलेली एक घटना इमामपूर गावामध्ये आज भी आदिवासी भील बांधवांच्या दफनभूमीवर काही धन दांडगे डोळा टपून बसलेले आहेत आदिवासी समाजाच्या अज्ञान पणाचा साधे भोळेपणाचा फायदा गावातील काही लोकांनी घेतलेला असून आज देखील या समाजाला गावात जर कुणाची मयत झाली तर अंत्यविधीसाठी असलेली पूर्वी पार द फन भूमीवर काही लोकांनी बेकायदेशीर होते अतिक्रमण केले आहे एकदा फोन भूमीचा इतिहास खूप जुना असून सुमारे 1968 या काळापासून माझे आजोबा बंडू बर्डे आणि त्यांचे काही सहकारी मित्र कायद्याच्या चौकटीपर्यंत हे भांडण घेऊन गेले परंतु विषय असा झाला की यांना शिक्षणाचा अनुभव आणि महसूल खात्यातील कार्यप्रणाली माहीत नसून यांचा हा लढा अर्धवट राहिला त्यानंतर 2011- 12 च्या दरम्यान माझे वडील सखाराम बंडू बर्डे यांनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी हरिचंद्र शंकर दळवी दत्तात्रय शंकर दळवी आशा चार-पाच जणांनी मिळून पुन्हा हा अर्धवट राहिलेला लढा उचलून धरणाचा प्रयत्न केला पुन्हा या आदिवासी समाजाच्या दफन भूमी प्रकरण न्यायालयात सादर करण्यात आला परंतु यांचा देखील तोच प्रश्न होता शिक्षणाचा अभाव महसूल खात्याची कार्यप्रणाली माहीत नसणे तसेच परिस्थिती बिकट साधे भोळेपणा पैशाची कमी आर्थिक अडचण असे बरेच अडचणींना सामना करत या चार-पाच जणांनी इमामपूर वाडी येथील आदिवासी भिल समाजाच्या दफनभूमीसाठी लढवण्याचा ठरवलं समोरच्या ज्या व्यक्तीवर खटला भरला होता तो व्यक्ती देखील स्वतःला खूप काही कायदे पंडित समजायचा त्यामध्ये तलाठ्यासोबत त्याचं उठणं बसणं तहसील मध्ये जाने अधिकारी यांच्यासोबत सदरील व्यक्तीचे नातेसंबंध चांगल्या पद्धतीचे होते त्यामुळे माझे वडील आणि त्यांचे सहकारी मित्रांना हे दफनभूमीच्या लढ्यासाठी खूप संघर्ष सोसावा लागला आणि एक दिवस अखेर त्यांनी देखील आर्थिक अडचणीमुळे माघार घेऊन टाकली कारण यामध्ये काही राजकारणी लोक आणि काही स्वतःला कायदे पंडित समजणारे देखील होते विशेष म्हणजे हा सर्व खटाटोप कशासाठी चालू आहे तो केवळ या आदिवासी भिल समाजाच्या दफन भूमीमध्ये बिगर आदिवासी समाजाच्या व्यक्तींनी बेकायदेशीर रित्या पाण्याच्या विहिरी खांदून ठेवल्यात परंतु हसण्यासारखी गोष्ट त्यांनी अशी करून ठेवली की समोरच्या एका व्यक्तीकडे 39 गुंठे एवढे जमीन आहे त्यापैकी सात गुंठे जमीन या व्यक्तीने विहिरीसाठी विक्री केली मग त्याच्यापाशी असलेली 39 गुंठे पैकी सात गुंठे कमी व्हायला पाहिजे आणि त्याच्याजवळ फक्त 32 गुंठे एवढी जमीन उरायला पाहिजे होती परंतु ज्यांना विहिरीसाठी जागा दिली त्यांना रजिस्ट्री या व्यक्तीने याच्या सातबारातील जमिनीतून करून दिली आणि प्रत्यक्ष मात्र यावेळी जेव्हा वावरातून विहिरींना जागा विकली त्या हद्दीत बांधले गेलेच नाही असा खूप काही महत्त्वाचा विषय आणि खूप गंभीर प्रकरण आज मी संपूर्ण जगासमोर ठेवण्यास तयार झाला कारण मला माहित नाही की मी योग्य करतोय की अयोग्य पण मनात एक इच्छा तयार झाली की आपण हा चालू असलेला पूर्ण प्रकार जगासमोर मांडूया त्यामुळे आज इथपर्यंत थांबतो आणि उद्या पुन्हा या उर्वरित प्रकरणाचा पुढचा भाग म्हणजे पुढची कथा या प्रकरणाची तुमच्यासमोर मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि या प्रकरणाचे संदर्भात असलेले सर्व व्यक्तींचे नावे जमिनीचा गट नंबर झालेले पंचनामे सर्व हळूहळू तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करेन चला तर मग भेटूया उद्या नक्कीच...........👍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

👉 👉 पोलीस स्टेशनच्या बाबतीत सर्वांच्या जीवनात उपयोगि पडणारे अतिशय मोलाची माहिती 👍

👉👉 नमस्कार आज आपण पुन्हा ब्लॉगिंग चालू केलेले आहे या ब्लॉगिंग मध्ये आज अतिशय छान असा लेख घेऊन आलो आहे या लेखात असलेली माहिती सर्वांसाठीच ख...